जलप्रदूषण मराठी माहिती । Jal Pradushan In Marathi

नमस्कार, इंस्टामराठी या वेबसाईटवर तुमचा स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत Jal Pradushan In Marathi.

“पाणी हे जीवन आहे” असं कुणीतरी बरोबरच म्हटलंय. कारण सर्व सजीवांना त्यांच्या जीवनाच्या मूलभूत कार्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. माणसाला काही काळ अन्न मिळाले नाही तर तो जगू शकतो, पण माणसाला पाणी मिळाले नाही तर तो जगू शकणार नाही. हे माणूस विसरला आहे. खरंच पाणी हे जीवन आहे,

फक्त माणूसच नाही तर सर्व सजीवांना जगण्यासाठी पाण्याची गरज असते. त्याशिवाय सर्व सजीव जिवंत राहू शकणार नाहीत. परंतु आजच्या काळात घाणेरडे नाले, सीवर लाईन, कारखान्यांमधून बाहेर पडणारे घाण पाणी तसेच विषारी केमिकल्स नद्यांमधील स्वच्छ पाण्यात सोडले जातात. त्यामुळे ते पाणी दूषित होते. 

ऐतिहासिकदृष्ट्या मानवी संस्कृती हि नद्या आणि प्रमुख जलमार्गांभोवती विकसित झाली आहे कारण मानवांना पिण्यासाठी, त्यांच्या पाण्याच्या वापरासाठी किंवा शेतीसाठी या पाण्याच्या स्त्रोतांमधून भरपूर पाणी सहज मिळू शकते.

वाढती लोकसंख्या आणि मानवी हस्थक्षेपामुळे सुरक्षित पाणी प्रदूषित होऊ लागले आहे. मानवी वापराच्या सुरक्षित पाण्याला पिण्याचे पाणी किंवा पिण्यायोग्य पाणी असे म्हणतात. जे पाणी पिण्यायोग्य नाही ते गाळणे किंवा ऊर्धपातन किंवा इतर पद्धतींनी पिण्यायोग्य बनवता येते. जे पाणी पिण्यास योग्य नाही परंतु मानवांसाठी किंवा इतर प्राण्यांसाठी हानिकारक नाही असे पाणी आपण आपल्या दैनंदिन वापरासाठी किंवा शेतीसाठी वापरतो.

तर, आज आपण जलप्रदूषण म्हणजे काय, त्याचे प्रकार, कारणे आणि परिणाम काय आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत.

जलप्रदूषण म्हणजे काय? | What is Jal Pradushan in Marathi

जलप्रदूषण ही आजच्या युगातील फार मोठी समस्या आहे. जेव्हा विषारी पदार्थ नद्या, सरोवरे, कालवे, समुद्र आणि इतर जलस्रोतांमध्ये प्रवेश करतात आणि ते त्यात विरघळतात किंवा काही प्रदूषके पाण्यात तसेच पडून राहतात किंवा पाण्याच्या तळाशी गोळा होतात. त्यामुळे ते पाणी प्रदूषित होते आणि त्यामुळे पाण्याची गुणवत्ता घसरते. यालाच जलप्रदूषण असे म्हणतात. अशा प्रदूषित पाण्याचा माणसांवर, प्राण्यांवर, वनस्पतींवर आणि जलचर प्राण्यांवर घातक असा परिणाम होतो.

जलप्रदूषण हे भारतातील सर्वात मोठे संकट आहे. त्याचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे प्रक्रिया न केलेले सांडपाणी. प्रदूषणाचे इतरही अनेक स्रोत आहेत. उदाहरणार्थ, शेतातून येणारे पाणी, लहान आणि अनियंत्रित उद्योगांमधून येणारे पाणी. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, भारतात असा एकही जलस्त्रोत शिल्लक नाही, जो अजिबात प्रदूषित नाही.

वस्तुस्थिती अशी आहे की देशातील 80 टक्क्यांहून अधिक जलस्रोत मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले आहेत. यापैकी ते जलस्रोतही अधिक प्रदूषित आहेत, ज्यांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात लोकसंख्या राहते. गंगा आणि यमुना ही भारतातील सर्वात प्रदूषित नद्यांपैकी एक आहे.

जलप्रदूषणाची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत | Reasons of Jal Pradushan in Marathi

  • औद्योगिक सांडपाणी आणि कचरा
  • कृषी क्षेत्रातील रासायनिक खते
  • शहरांतील सांडपाणी
  • जहाजांमधून तेल गळती
  • ऍसिड पाऊस (Acid Rain)
  • ग्लोबल वार्मिंग
  • युट्रोफिकेशन (Eutrophication)
  • सामाजिक आणि धार्मिक प्रथा, जसे मृतदेह पाण्यात टाकणे, आंघोळ करणे, कचरा फेकणे.
  • औद्योगिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अपुरी व्यवस्था
  प्लॅस्टिक शाप कि वरदान | Plastic Shap Ki Vardan

भारतातील जल प्रदूषणाची कारणे | Indian Reasons of Jal Pradushan in Marathi

भारतातील जलप्रदूषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे शहरीकरण आणि त्याचा अनियंत्रित दर. गेल्या दशकात शहरीकरणाचा वेग अतिशय वेगाने वाढला आहे किंवा आपण असेही म्हणू शकतो की या शहरीकरणाने देशाच्या जलस्रोतांवर अमिट छाप सोडली आहे.

त्यामुळे दीर्घकाळापासून पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामध्ये पाणीपुरवठ्याचा अभाव, पाण्याचे प्रदूषण आणि त्याची साठवणूक या बाबी प्रमुख आहेत. या संदर्भात प्रदूषित पाण्याची विल्हेवाट आणि प्रक्रिया हा एक मोठा प्रश्न आहे. नद्यांच्या जवळ अनेक शहरे आणि गावे आहेत, ज्यांनी या समस्या वाढविण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.

अनियंत्रित शहरीकरणामुळे या भागात सांडपाणी वाहून जात आहे. शहरी भागात नद्या, तलाव, कालवे, विहिरी आणि तलावांचे पाणी घरगुती आणि औद्योगिक गरजा भागवण्यासाठी वापरले जाते. आपल्या घरातील 80% पाणी वाया जाते. बहुतेक प्रकरणांमध्ये पाण्यावर योग्य प्रक्रिया केली जात नाही आणि त्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर वाहणारे ताजे पाणी प्रदूषित होते.

भूपृष्ठावरून जाणारे हे प्रदूषित पाणी भूगर्भातील पाण्यात मिसळून ते पाणीही प्रदूषित होत आहे. एका अंदाजानुसार, एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये एका दिवसात 16,662 दशलक्ष लिटर सांडपाणी सोडले जाते. आश्चर्याची बाब म्हणजे या शहरांतील 70 टक्के लोकांना सांडपाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. देशातील सुमारे 33 टक्के सांडपाणी गंगा नदीच्या काठावर वसलेल्या शहरांमध्ये आणि खेड्यांमध्ये निर्माण होते.

जल प्रदूषणाचे परिणाम | Effects of Jal Pradushan in Marathi

मानवी आरोग्यावर होणाऱ्या समस्या:

सर्व प्रकारच्या जलप्रदूषणाचा शेवटी मानव आणि प्राण्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. प्रदूषित पाणी दीर्घकाळ प्यायल्याने किंवा वापरल्याने मानव आणि प्राण्यांमध्ये टायफॉइड आणि कॉलरासारखे विविध आजार होऊ शकतात. प्रदूषित पाण्यामुळे कॉलरा, क्षयरोग, जुलाब, कावीळ, उलट्या, जुलाब असे आजार होऊ शकतात. भारतात पोटाचे विकार असलेले 80 टक्के रुग्ण प्रदूषित पाणी पिल्याने आजारी पडलेले असतात.

पर्यावरणाची हानी:

जलप्रदूषणामुळे आपल्या आजूबाजूच्या वातावरणावरही परिणाम होतो, आजूबाजूच्या वातावरणात दुर्गंधी येते ज्यामुळे आजूबाजूची हवा दूषित होते आणि पर्यावरण दूषित होते.

वनस्पती आणि जीवजंतूंवर होणारा परिणाम:

वनस्पती आणि प्राण्यांच्या असंख्य प्रजाती आहेत ज्या त्यांच्या अस्तित्वासाठी पाण्यावर अवलंबून असतात. त्यामुळे ते जलप्रदूषणाच्या प्रभावांना बाली पडतात.

सुरक्षित आणि शुद्ध पाण्यावर होणार परिणाम :

मी आधी म्हटल्याप्रमाणे स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण खूपच कमी आहे आणि जलप्रदूषणामुळे हे प्रमाण कमी होत चाललेआहे. त्यामुळे पाण्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. शहरांमध्ये आणि खेड्यांमध्ये सांडपाण्याच्या विल्हेवाट करण्याच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे स्वछ आणि पिण्यायोग्य पाण्याची कमतरता भासत आहे.

अन्न साखळीवर परिणाम:

रसायने, जड धातू आणि इतर दूषित पदार्थ सूक्ष्मजीवांद्वारे सेवन केले जाऊ शकतात. हे नंतर मोठे प्राणी खातात आणि त्यामुळे अन्नात येणाऱ्या जीवांवर परिणाम होतो.

शेतीवर होणार परिणाम :

एका विशिष्ट स्तरावर प्रदूषित पाणी देखील पिकांसाठी हानिकारक ठरते. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. एकूणच कृषी क्षेत्रावर आणि देशावरही याचा परिणाम होतो.

जलचर प्राण्यांवर होणारा परिणाम:

समुद्राचे पाणी प्रदूषित झाल्यास त्याचा वाईट परिणाम सागरी जीवनावरही होतो. जेव्हा विषारी पदार्थ पाण्यात मिसळले जातात तेव्हा ते पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करतात ज्यामुळे जलचर प्राण्यांना पाण्याखाली श्वास घेताना समस्या निर्माण होतात.

तेलाच्या गळतीमुळे निर्माण झालेल्या प्रदूषणामुळे पाण्यावर एक थर तयार होतो ज्यामुळे सूर्यप्रकाश आणि ऑक्सिजन रोखला जातो आणि जलचरांसाठी विविध समस्या निर्माण होतात. कधीकधी हे जलचर प्राणी प्लास्टिक आणि रबर गिळतात ज्यामुळे त्यांचे अवयव निकामी होतात आणि शेवटी त्यांचा मृत्यू होतो.

  डेटा सायन्स म्हणजे काय? डेटा सायंटिस्ट कसं व्हायचं? | Data Science Information in Marathi

जल प्रदूषण उपाय | Remedies to Reduce Jal Pradushan in Marathi

  • जलप्रदूषणावर उत्तम उपाय म्हणजे ते होऊ न देणे.
  • घरगुती सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे. मोठ्या शहरांमध्ये सांडपाणी हि एक मोठी समस्या आहे. त्यामुळे सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ते व्यवस्थापन केले पाहिजे.
  • औद्योगिक सांडपाणी, जे मोठ्या तसेच छोट्या कारखान्यांमधून येणारे विषारी रसायने आणि सांडपाणी यामुळे सर्वात जास्त जलप्रदूषण होते. अशा पाण्याची योग्य रित्या विल्हेवाट लावणे. कारखान्यांमधून निघणारे घटक विषारी रसायने पाण्यात सोडण्यापूर्वी त्यांवर प्रकिया करावी आणि मगच त्याची विल्हेवाट लावावी.
  • कृषी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमुळेही जलप्रदूषण वाढत आहे. त्यामुळे शेतामध्ये शक्यतो रासायनिक खतांचा वापर कमी करावा. सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा. तसेच शेतीच्या अशा पद्धतींचा अवलंब करावा ज्यामुळे जलप्रदूषण कमी व्हायला पाहिजे.
  • यासोबतच विषारी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य पद्धतींचा अवलंब करणेही अत्यंत आवश्यक आहे.
  • प्लास्टिक कचरा आणि इ-कचरा पाण्यात न फेकता त्याचे योग्य वयःस्थापन करावे. प्लास्टिक कचरा आणि इलेक्ट्रॉनिक कचरा यांना शक्यतो रिसायकल करावे.
  • पेंट्स, साफसफाई करण्यासाठी वापरली जाणारी रसायने यांची सुरक्षित विल्हेवाट अत्यंत महत्त्वाची आहे.
  • जल प्रदूषण होण्याचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे तेल गळती. जिथे तेल गळती होण्याची शक्यता असते तिथे जास्त काळजी घ्यावी. जरी तेल गळती झाली तर तिथे योग्य ती यंत्रणा सज्ज ठेवावी.
  • नद्या, सरोवरे, जलमार्ग आणि समुद्रकिनारे नियमित स्वच्छ करणे
  • प्लॅस्टिकसारख्या नॉन-बायोडिग्रेडेबल पदार्थांचा वापर टाळणे
  • जलप्रदूषण कमी करण्यासाठी संशोधन करणे.

हे पण वाचा : प्लॅस्टिक शाप कि वरदान | Plastic Shap Ki Vardan

जागतिक स्तरावरील जलप्रदूषण | International Level Jal Pradushan in Matrathi

जलप्रदूषण ही एक मोठी जागतिक समस्या आहे. यासाठी सर्व स्तरांवर जलसंपत्ती धोरणाचे सतत मूल्यांकन आणि सुधारणा आवश्यक आहे कारण जलप्रदूषणामुळे जगभरात अनेक रोग आणि मृत्यू होत आहेत.यामुळे दररोज सुमारे हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. ज्यामध्ये भारतातील लोकांचादेखील समावेश आहे.

चीनमध्ये शहरांमधील 90 टक्के पाणी प्रदूषित आहे. 2007 मधील एका माहितीनुसार, चीनमध्ये 5 दशलक्षहून अधिक लोक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. जलप्रदूषणाची ही समस्या प्रामुख्याने विकसित देशांमध्ये आढळते.

यूएस मध्ये, वाहत्या प्रवाहाचे 45 टक्के पाणी, 47 टक्के तलावाचे पाणी, 32 टक्के खाडीचे पाणी प्रदूषित पाण्याच्या श्रेणीत घेतले गेले आहे. चीनमधील राष्ट्रीय विकास विभागाच्या 2007 च्या विधानानुसार, चीनमधील सात नद्यांमध्ये विषारी पाणी आहे, ज्यामुळे मानवी जीवनाला तसेच पाण्यातील सजीवांना नुकसान होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *